Sindhutai Sapkal सिंधुताई सपकाळ ह्या एक प्रख्यात समाजसुधारक आहेत. त्यांनी खूप अनाथ मुलांचे स्वतःच्या मुलांप्रमाणे देखभाल केली. अनेक खडतर प्रसंगांना मागे सारत त्यांनी अनेकांना जीवनदान देऊन पालन पोषण केलंय.
भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूपच कठीण आहे. श्रीमंत असो वा दीनदुबळे त्यांना समाजातील खूप अडचनींना सामोरे जावे लागते. त्यांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत सन २०१६ मध्ये डी वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी तर्फे सिंधुताई सपकाळ यांना साहित्यात डॉक्टरेट हि पदवी बहाल करण्यात आली.
सिंधुताई यांची वयक्तीक माहिती
समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जनावरे पाळणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना फटके अथवा ठिगळांचे कपडे घालावे लागत होते.
सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. त्यांचे वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चारत . या रिकाम्या वेळेत ताई शाळेत जाऊन बसत असत.
आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना लहानग्या वयात घरातील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या. त्यांचा बालविवाह झाल्यामुळे त्यांना चौथीपर्यंत शिकता आले आणि नंतर त्यांना अनपेक्षित शाळा सोडावी लागली.
सिंधुताईंचे कुटुंब आणि सुरुवातीचे जीवन
सिंधुताईं सपकाळ यांचा विवाह वयाच्या अगदी नवव्या वर्षी झाला . ताईंच्या वयापेक्षा २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा वर्धा जिल्ह्यात विवाह झाला. लग्नानंतर त्यांना अतिशय अवघड जीवनाचा सामना करावा लागला पण त्यांनी उम्मेद गमावली नाही.
त्यांच्या गावी त्यांनी महिलांच्या शोषणाविर्रुद्ध लढा दिला ज्याचा वापर वन विभाग आणि जमीनदारांसाठी शेण गोळा करण्यासाठी होत असे. यामुळे त्यांचे जीवन अजून कठीण झाले.
या लढाईनंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल याची त्यांना कल्पना नव्हती . वयाच्या अवघ्या २० वर्षाच्या असताना त्या पाहिल्यान्दा गरोदर राहिल्या . जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा एका कपटी जमीनदाराने कपट मनाने लज्जास्पद अफवा पसरविली कि हे मूल दुसर्याचे आहे.
त्यामुळे त्यांच्या नवऱ्याच्या म्हणजेच श्रीहरी यांच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, त्यामुळे नवरा तसेच गावकर्यांनी ही त्यांना गावाबाहेर काढले.
त्याच रात्री सिंधुताईला अतिशय निराश दुख्खद आणि मोठा धक्का बसला होता, त्यात त्यांना प्रसव वेदना सुरु होताच त्यांनी एका गाईच्या गोट्यामध्ये मुलीला जन्म दिला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी त्यांनी धडपड केली, परंतु त्यांच्या आईनेही त्यांना साथ देण्यास नकार दिला.
सिंधुताईंनी आपल्या दैनंदिन गरजा व भूक भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली. त्यांचे खूप हे संघर्षमय जीवन हे स्वतःचे आणि त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते.
जगण्याच्या या कठीण काळात सिंधुताई भटकंती करत करत महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील चिकलदारा येथे आल्या. येथे आल्यावर त्यांना समजले कि वाघ संरक्षण प्रकल्पामुळे ८४ आदिवासी लोकांची गावे रिकामी करण्यात आली आहे . त्यामुळे सिंधुताईंनी त्या आदिवासी लोकांची निवासाची योग्य सोय करण्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्यला वनमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांना निवाऱ्यासाठी योग्य ती व्यवस्था केली.
त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागल्या. आपल्या दैनंदिन गरजा व भूक भागवण्यासाठी भीक मागणे आणि आपल्या मुलीला रात्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानभूमीत राहू लागल्या.
आपल्या या संघर्षमय काळात त्यांच्या लक्षात आले की राज्यात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले की जो कोणी अनाथ त्यांच्या कडे आला कि त्या त्याचा आई म्हणून सांभाळ करतील .त्यांनी आपली स्वतःची मुलगी पुणे येथील श्री दगडूशेठ हलवाई, ट्रस्टला दत्तक दिली, कारण त्यांना अनेक अनाथ मुलांच्या आई बनायचे होते.
बरीच वर्षे खूप कष्ट घेतल्यावर सिंधुताईंनी चिकलदरा येथे पहिले आश्रम बांधले. त्यांनी आश्रम च्या कार्यासाठी बरयाच गावानं भेटी दिल्या . आतापर्यंत, त्यांनी १२०० मुलांना दत्तक घेऊन सांभाळले आहे, जे प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणून ओळखतात . त्यापैकी बरेच लोक आता प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि इंजिनीर म्हणून काम करत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
Sindhutai Sapkal यांचा आदर्श
सिंधुताई सपकाळ यांची प्रेरक जीवन कथा नशिब आणि दृढनिश्चय याबद्दल आहे.आपल्या जीवनामध्ये अडचणी कशा निर्माण होऊ त्यांना कसे सामोरे जावे याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण भारतीय समाजाच्या उपस्थित सामाजिक अत्याचारांना त्या बळी पडल्या. आपल्या जीवनात खूप संघर्ष करून त्यांनी महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम बनवले, त्यांना अन्न, शिक्षण आणि राहण्यासाठी सोयी उपलब्ध करुन दिला. सिंधुताईमार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय आणि बेघर महिलांना मदत केली.
आपल्या अनाथ आश्रमाचा खर्च भागवण्यासाठी सिंधुताईंनी कधीच पैशासाठी कुणापुढे हात कधीच पसरवले नाहीत, त्याहुन ही अधिक त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचितांना व उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला.आनंदाची गोष्ट म्हणजे त्यां मुलांसोबत राहणे, त्यांचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना आयुष्यात स्थायिक करणे हेच त्यांचे उद्देश होते.
सिंधुताई संचलित संस्था
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा (गोपालन)
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे.
सिंधुताईंच्या जीवनावरील चित्रपट
“मी सिंधुताई सपकाळ” हा सिंधुताई सपकाळ यांच्या खर्या कथेने प्रेरित करणारा एक बायोपिक आहे. अनंत महादेवन यांनी डायरेक्ट केलेला २०१० मधील मराठी चित्रपट ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती.
पुरस्कार व गौरव
- सिंधुताईंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-
- महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
- महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)
- मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कारशिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- श्रीरामपूर-अहमदगर येथील सुनीता कलानिकेतने दिलेला सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)
- CNN -IBNN आणि रिलायन्स फाउंडेशन तर्फे ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).२००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
- डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
- पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
सिंधुताईंचा मृत्यू
आपल्या सर्वांसासाठी अत्यंत दुःखद दिवस म्हणजे ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यू होण्याच्या अवघ्या ३० दिवसापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला. २५ नोव्हेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये हर्निया शस्त्रक्रियेनंतर सपकाळ यांची काळजी घेण्यात येत होती. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजून १० मिनीटांना त्यांचे निधन झालेजो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला !